1.पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता?
i.न्यायमूर्ती म.गो. रानडे
ii.डॉ. आर. जी. भांडारकर
iii.न्यायमूर्ती के. टी. तेलंग
iv.बापू हरी शिंदे
2.इ. स. १९१८, साली मुंबईतील कामगारांना 'पिपल्स युनियन' ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता?
3.ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला?
4.'मालविकाग्निमित्र' या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो?
5.वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम कोणते होते?
i.निष्क
ii.कृष्णाल
iii.शतमान
iv.गण
v.श्रेणी
6.सेतू माधवराव पगडी यांच्या मते, नाथ पंथातील कोणत्या संताने 'शहा रमजान' हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्या कडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे.
7.खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा
i.श्वेत पत्रिका
ii.पुणे करार
iii.नेहरू अहवाल
iv.धारासना सत्याग्रह
8.पुढील वाक्ये ______ यांच्या विषयी आहेत.
i.महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली
ii.त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली
iii.गणित आणि शास्त्रावर त्यांनी 'शून्यलब्धी' हे पुस्तक मराठीतून लिहिले
iv.केशवराव भवाळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे
9.पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा.
i.पुणे सार्वजनिक सभा
ii.बॉम्बे प्रेसिडेंन्सी असोसिएशन
iii.मद्रास महाजन सभा
iv.इंडियन असोसिएशन
10.खालील पैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेणार आला ?