1. मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत? i. पंतप्रधान ii. लोकसभेतील विरोधी नेता iii. राज्यसभेतील विरोधी नेता iv. पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री v. लोकसभा सभापती पर्यायी उत्तरे 1 i, ii आणि iv 2 i, ii, iii आणि v 3 i, ii, iii आणि iv 4 i, ii आणि v
2. भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या पदाची तरतूद आहे? पर्यायी उत्तरे 1 कलम 148 2 कलम 343 3 Article 266 4 Article 248
3. ‘केशवानंद भारती’ खटल्याबाबत खालील विधाने विचारात घेऊन अचूक विधान/ने निवडा : i. सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तींच्या घटनापिठापुढे चालला. ii. सात विरुद्ध सहा न्यायमूर्तींच्या बहुमताने घटनापठाने मूलभूत संरचना सिद्धांताची (Basic Structure Doctrine) रूपरेषा दिली. iii. या खटल्याने ‘गोरखनाथ’ प्रकरणातील निर्णय बदलला गेला. iv. सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल. पर्यायी उत्तरे 1 i, ii आणि iii 2 ii, iii आणि iv 3 केवळ ii 4 i, ii, iii आणि iv
4. भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला आहे? पर्यायी उत्तरे 1 भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक 2 भारताचे राष्ट्रपती 3 भारताची संसद 4 भारताचे पंतप्रधान
5. घटकराज्यातील आणीबाणीसंदर्भातील ‘बोम्मई खटल्या’ बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ? i. बोम्मई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला. ii. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. iii. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय राज्य करू शकते. iv. घटकराज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते. पर्यायी उत्तरे 1 फक्त iii आणि iv 2 i, ii, iii आणि iv 3 फक्त ii, iii आणि iv 4 फक्त i, ii आणि iii
6. अयोग्य जोडी ओळखा : पर्यायी उत्तरे 1 जुलै २२, १९४७ - संविधान सभेद्वारा राष्ट्रध्वजाचा स्वीकार 2 जानेवारी २४, १९५० - संविधान सभेद्वारा राष्ट्रगीताचा स्वीकार 3 जानेवारी २५, १९५० - शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिका स्वीकार 4 जानेवारी 26, 1950 - शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार
7. भारतातील घटना दुरुस्ती संदर्भात खालील विधान/विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा : i. 10 व्या घटना दुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश भारतास जोडण्यात आले. ii. 11 व्या घटनादुरुस्तीनुसार दिव, दमण व गोवा हे प्रदेश भारतास जोडण्यात आले. iii. 15 व्या घटनादुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळांची स्थापना करण्यात आली. iv. 22 व्या घटनादुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली. पर्यायी उत्तरे 1 i आणि iii बरोबर 2 ii आणि iv बरोबर 3 ii आणि iii बरोबर 4 i आणि iv बरोबर
8. केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो? पर्यायी उत्तरे 1 पाच माहिती आयुक्त 2 दहा माहिती आयुक्त 3 सहा माहिती आयुक्त 4 आठ माहिती आयुक्त
9. भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधान/ विधाने कोणती? i. भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे. ii. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला. iii. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. पर्यायी उत्तरे 1 फक्त i आणि iii बरोबर 2 फक्त i बरोबर 3 फक्त i आणि ii बरोबर 4 वरील सर्व बरोबर आहेत
10. राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात ? पर्यायी उत्तरे 1 कलम 124 ते 128 2 कलम 324 ते 329 3 कलम 256 ते 259 4 कलम 274 ते 279