एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पृष्ठ क्रमांक - 5 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 41 ते 50

Language :

English

41. "विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960 च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही." हे विधान कोणाचे आहे ?

पर्यायी उत्तरे

42. राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता ?

पर्यायी उत्तरे

43. भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्रयाची खालीलपैकी कोणते/ती कारण/कारणे आहे/आहेत ?

  • i. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून.
  • ii. उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता.
  • iii. विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर.
पर्यायी उत्तरे

44. एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राबविण्यात येणारा/रे कार्यक्रम ____.

  • i. पूरक पोषण आहार कार्यक्रम
  • ii. आरोग्य तपासणी
  • iii. कामगार प्रशिक्षण
  • iv. स्त्री-पुरुष असमानता
पर्यायी उत्तरे

45. 2011 च्या जनगणनेनुसार, सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरांत रहात होती ?

  • i. मुंबई
  • ii. चेन्नई
  • iii. कलकत्ता
  • iv. दिल्ली
पर्यायी उत्तरे

ADVERTISEMENT

46. 2011 च्या जनगणनेनुसार, भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या ____ टक्के आहे.

पर्यायी उत्तरे

47. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/त ?

  • i. जास्तीत जास्त दोन अपत्ये नुसार 2050 साला पर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे.
  • ii. सार्वत्रिक लसीकरण.
  • iii. अर्भक मृत्युचे प्रमाण प्रति हजारी 30% पेक्षा खाली आणणे.
पर्यायी उत्तरे
# CANCELLED

48. जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते दोन पैलू आहेत ?

  • i. भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा
  • ii. एकत्रित जमीन मालकी मर्यादा
  • iii. विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा
  • iv. रूपांतरावर मर्यादा
पर्यायी उत्तरे

49. खालील विधाने विचारात घ्या :

  • i. लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे.
  • ii. वरील चार घटकाचा विचार केल्यास स्त्री-पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो.
पर्यायी उत्तरे

50. 26 जून, 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतु पुढीलपैकी कोणता होता ?

  • i. राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे.
  • ii. दारिद्र्य रेषेखालील लोकांना साहाय्य करणे (दारिद्र्य निर्मूलन).
पर्यायी उत्तरे